(कदंबनरेशाचे चार दूत दोन कैद्यांना पकडून कुंतल देशाच्या राजाकडे घेऊन गेले व त्याला म्हणाले कीं, त्या दोघांनी मंत्र्यांचा मुलगा व त्याच्या मित्राची हत्या केली आहे. त्यानंतर ते आपल्या देशांत परत जात असताना कुंतल देशाच्या सैनिकांनी त्यांच्यापैकी दोघांच्या गळ्यांत फांस टाकून ठार केले आणि कैद्यांची सुटका केली. त्यानंतर...)
(कदंबनरेशाचे चार दूत दोन कैद्यांना पकडून कुंतल देशाच्या राजाकडे घेऊन गेले व त्याला म्हणाले कीं, त्या दोघांनी मंत्र्यांचा मुलगा व त्याच्या मित्राची हत्या केली आहे. त्यानंतर ते आपल्या देशांत परत जात असताना कुंतल देशाच्या सैनिकांनी त्यांच्यापैकी दोघांच्या गळ्यांत फांस टाकून ठार केले आणि कैद्यांची सुटका केली. त्यानंतर...)
कदंबनरेशाचे दुसरे दोन दूत घोड्याला टांच मारून ओढा ओलांडून आपल्या राज्यांत पोचले. कुंतलच्या सैनिकांचे बाण त्यांना लागले नाहीत. मध्यरात्र झाली होती. धूसर चांदणे पसरले होते व जंगलही घनदाट होते. त्यामुळे सैनिक दूतांवर नेम धरून बाण मारूं शकले नाहीत. आणि कदंब राज्याचे दोन दूत सुखरूप स्वतःच्या राज्याच्या हद्दींत पोचले. कुंतलच्या सैनिकांचा सरदार चिंताग्रस्त झाला. कोणताही दूत परत जाता कामा नये, असा मंत्र्यांचा आदेश होता. ते राजाला कांहीही सांगू शकतील व दोन्ही देशांत युद्ध होण्याचीही शक्यता आहे, असे त्याला वाटले.
‘‘ओढा पार करून त्या दूतांचा पाठलाग करणे धोक्याचे आहे. कदंब राज्याचे सीमारक्षक त्यांच्या मदतीला येऊं शकतात. पण कांही झाले तरी त्यांना जिवंत सोडता कामा नये. सांगा, तुमच्या पैकी कोण शत्रूच्या प्रदेशांत जाऊन त्यांचा पाठलाग करेल, आणि त्यांना जिवंत किंवा मृत पकडून आणूं शकेल? त्यांना मारणार्यास मंत्री बक्षीस देतील.’’ कुंतलच्या सैनिकांचा सरदार म्हणाला.
|